शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

बर झाला अवदसा टळली आज एक नवा दिवस ठरला................!!!!!!!!!

                                                        !! श्री !!                                                                                           
                 आज भारतीय सौरशके -१९३३, मार्गशीर्ष शुक्ल -१४, वार-शुक्रवार, श्रीदत्त जयंती (श्रीक्षेत्र गाणगापूर), दिनांक-०९/डिसेंबर/२०११.

                    आज पहाटेच ०४:४० ला गजरामुळे जाग आली. उठल्यावर व्यायमला जाण्यासाठी अगोदर गवळी सर यांना ३ वेळा फोन केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. त्या नंतर डोरले सर यांना फोन केला. पण त्यांनी पण फोन उचलला नाही. त्यामुळे गवळी सर व डोरले सर यांना झोपीतुन उठवण्याचे ठरवले. व बर्मुडा घातला त्याच बरोबर शाल,बॅटरी घेतली. बाहेर आलो बकेट घेतली व चौकात गेलो. चौकात गेल्यावर पण गवळी व डोरले यांना फोन केले पण दोघांनी पण प्रतिसाद दिला नाही. मग मात्र या दोघांना उठवण्याचा ठरवल. व अगोदर गवळी यांच्या घरी जाऊन त्यांना हाका मारल्या. ते बाहेर आले नाहीत अस पाहून मग डोरले सर यांच्या घरी जाऊन यांना हाका मारून उठवण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. मग मात्र स्वतः एकटाच व्यायम करण्यास जाण्याचे ठरवले. व परत निघालो. पण गवळी सर यांच्या घरा समोरून जाताना पाहिलं की, ते जागे झाले आहेत. मग यांना आवाज दिला व मी चौकात येऊन थांबलो. माझ्या माघून गवळी सर आले. सर आल्यावर आम्ही दोघे व्यायाम करण्या गेलो. जाताना गप्पा मारत पण थोड्या वेगानेच गेलो. नेहमीच्या ठिकाणी व्यायाम केला. व साधारण ०६:२८ ला परत आलो. घरी परत आल्या आल्या झोपलो. 
                    झोपण्याचा प्रयत्न केला पण झोपू शकलो नाही. त्यामुळे ९:३५ पर्यंत नुसता पडून होतो. ९:३५ ला  उठलो. उठून अगोदर दाडी केली व त्या नंतर अंघोळ केली. अंघोळ उरकल्या नंतर बीडला जाण्याची तयारी केली. नास्ता व दुध घेतला व अक्काचा निरोप घेऊन बीडला जाण्यास निघालो. चौकात आलो तर तेथे गाडीची वाट पाहत असताना एका खातेदाराने मला हाक मारून घेतली त्यामुळे थोडा वेळ तेथे रेंगाळलो. तेव्हड्यात डोरले सर दिसले मग त्यांच्याकडे गेलो व त्यांना म्हणालो. 
"काय डोरले सर आता दंड द्या."
डोरले सर "ठीक आहे. कला गावात."
मी " ठीक आहे." 
अस म्हणून डोरले सरांच्या गाडी वर बसलो. व आम्ही दोघे गावात गेलो. गावात जाताच सरांनी काळे यांच्या हॉटेलकडे गाडी घेतली. तेथे आम्ही दोघांनी चहापाणी केले. त्यांच्या समोरच झा यांना फोन केला व सरांच्या एटीम कार्ड विषयी विचारला. व त्यांना झा साहेबाना भेट असे सांगून स्टँडकडे जाता जाता विकास टेलरच्या दुकानात थांबलो. तेथे दिनूच्या सह्याकेल्या व टेलरचा निरोप घेऊन स्टँडकडे वर आलो. तेथे आल्यावर विठ्ठल वंजारे याने हाक मारल्याने त्यांच्याकडे गेलो. त्यांनी त्यांच्या कामाची माहिती विचारली तेथे ही दुध घेतला व पुन्हा स्टँड वर येऊन थांबलो. तेथे एक आजोबा भेटले ते मांजरसुंभा येथे जाणार होते. त्या आजोबाना मी भेटल्याचा काय विशेष वाटल कुणास ठाऊक. ते माझ्या पायाचा पडू लागले. मी लगेच बाजूला झालो. व त्यांची विचारपूस सुरु केली. बहुदा ते त्यांच्या मुलीस भेटण्यासाठी आले होते. पण त्यांचा सोबत मी खूप वेळ थांबू शकलो नाही. कारण ते १ ला गेले असता नेकनुरच्या एका मुलाने मला लिफ्ट दिली त्याच्या गाडी वर मी नेकनूर पर्यंत गेलो. तेथे गेल्या गेल्या मला बीडला जाणारी गाडी भेटली. 
                    बीडला सरकारी दवाखान्या जवळ उतरू S.P. ऑफिस समोरील हॉटेलमध्ये नास्ता केला. व कोर्टाकडे निघालो. कोर्टात पोचताच पळसोकारांची भेट घेतली. त्यांनी मला कोर्टाने अर्ज माघारी घेत असल्याचे कारण विचारले तर " माझी पत्नी माझ्या बरोबर नांदावयास तयार असल्याने व मला मुलीच्या भविष्याची काळजी असल्याने सदर दावा चालवचा नाही. त्या मुळे मी दावा माघारी घेत आहे." असे उत्तर द्या म्हणून सांगितले. व मला लांब बसण्यास सांगितले. मी तहसील ऑफिसच्या बाजूला जाऊन थांबलो.व पळसोकारानि बोलावण्याची वाट पहात थांबलो. थोडावेळ तेथे थांबल्यावर आठवल की, माझे बूट असलेल्या जीप वल्यास फोन करू विचारावे की, तो बीड मध्ये आला आहे की नही. त्याला फो करून विचारले तर त्याने सांगितले की, माझे बूट डबीरच्या घरी आहेत. मी लगेच डबीरच्या घरी गेलो. डबीरयांची पत्नी व मुलगा घरात होते. बूट पिशवीत घातला. पाणी घेतला व त्या ताईचा निरोप घेतला व परत निघालो. परत निघताच पळसोकरांचा मला फोन आला. व फोन वर त्यांनी माझी बायको आल्याचे सांगितले. मी लगेच रिक्शाया केला व तडक कोर्टात गेलो. जाता जाता माझे बूट व ब्याग संपदा स्टेशानरी दुकानात ठेऊन कोर्टात गेलो. तेथे पाहतो तर काय पळसोकर हे माझी बायको, सासरा व त्यांचे वकील यांच्या सोबत बोलत असलेले पहिले. मला पाहताच पळसोकर माझ्याकडे आले. व त्यांनी मला अर्ज माघारी घेण्यास तिची आडचन नसल्याचे सांगितले. पण ते आपणास दंड मागतील अस सांगितला. व ते त्यांचा "से" देणार असल्याचे सांगितले. व पुन्हा मला पहिल्याच जागी बसण्यास सांगितले. त्या प्रमाणे मी जाऊन बसलो. पण माझा फोन डिसचार्ज झाल्याने मी फोन चार्जिंग करण्यासाठी पुन्हा समदा मध्ये गेलो. व तेथे माझ्याकडे असणारी एक बॅटरी चार्जिंगला लावली व परत कोर्टात जाऊन बसलो. त्याचा वेळेस मला २ ला जावे लागले. मी जाताच मला पळसोकरांचा फोन आला. मी परत येई पर्यंत तर पळसोकर कोर्टातून बाहेर आले होते. त्याचा दरम्यान एका मूर्ख बाईचे मला बोलणे खावे लागले. दरम्यान पळसोकरांची भेट घेतली व त्यांनी मला त्यांच्या टेबला जवळ थांबण्यास सांगितले. त्या प्रमाणे मी टेबला जवळ थांबलो. एव्हाना कोर्टाच्या जेवणाची सुट्टी झाली होती. मी कोर्ट सुरु होण्याची वाट पाहत थांबलो.