आज रोजच्या प्रमाणे उठून घरातील सर्व कांही उरकून कामाला निघतानाच Avd. पळसोकरांचा फोन आला. त्यांनी मला माझा निर्णय झाला कि नाही त्या विषयी विचारले मी त्यांना माझा निर्णय झाला असल्याचे संगितले. त्या नंतर त्यांनी मी काल बीडला आला होतात का? अस विचारला. त्यावर मी त्यांना हो म्हणालो.
एव्हाना माझ सर्व उरकून कामाला जात असतानाच श्री.ढवळशंखसरांचे पुतणे भेटले म्हणजे त्यांनी मला पाहूनच गाडी थांबवली. व मला बँकेजवळ आणून सोडले. तसेच वाटेत त्यांच्या काकांचे गृघकर्जाच्या व्याजाचे प्रमाणपत्र विषयी चौकशी केली. मी त्यांना दुपारी चार नंतर येण्यास सांगितले. आज मी कामाला १०:१५ लाच पोहचलो होतो. त्या नंतर १०:३५ ला झहा व कोकीळ साहेब आले. नेहमी प्रमाणे काम झाल. दुपारी आरके मामा सोबत काळे यांच्या हॉटेलवर चहा घेतला. गेली आठ एक दिवस थोडा बाहेर जाण्यास वेळ मिळतोच आहे. तेव्हडेच पाय मोकळे होतात. आज पळसोकाराना भेटण्या साठी जायचं सकाळीच ठरवला होत. सकाळीच साहेबाना मला उद्या ता. ०२/१२/२०११ रोजी रजा पाहिजे असल्याचे संगितले होते. जेवण झाल्यावर दुपारी सर्व काम आटोपल्या नंतर मारत दर पंधरा मिनिटांनी सतत साहेबाना उद्याच्या रजेचा विचारून रजा पदरात पडून घेतली. त्या नंतर बँक सुटल्यावर कोकीळ साहेबांकडे माझी चावी दिली.
मी कोकीळ व रोटे बसटॉप वर आलो. बीडला जाणार होतो. पण निर्णय बदलला. आज दुपारी कोकीळ साहेब यांना काल त्यांच्या पत्नीस व त्यांना रिक्ष्याने ठोस दिल्याचे कळले. त्यात कोकीळ यांना पायास व हातास जबर लागले होते. तश्या अवस्थेतही त्यांनी मला रजेवर जाण्यास मद्दत केली. त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार. मी उद्या बीडला येणार असल्याचे पळसोकाराना फोन करून सांगायचे होते. पण ते शक्य झाले नाही.
काम सुटल्यावर काळबेरे यांच्या नेकनूर येथील नेटक्याफेवर जावून बसलो. तेथे पण संगणक दोन तीन वेळा बंद पडून माझ्या नेक्नुरला जाण्याचा पुरा विचका केला. तरी हि नेकनूर येथून मला बाहेर पडण्यास ०९:२० झाल्याचा त्या मुळे धारूर गाडी गेली होती. मग मिळेलत्या वाहनाने जाण्याचे ठरून. वरून (मांजरसुंभा) येणाऱ्या प्रतेक वाहनास हात करू लागलो. दरम्यान आक्काचा चार पाच वेळा फोन आला होता. शेवटी एक कर थांबल्याचा भास झाला पण ती पुढे गेली. पण त्या कर मधून एक व्यक्ती उतरून मला हात करत असल्याचे जाणवले. वाटल आता बर झाल. जायला वाहन भेटलं म्हणून गाडीच्या जवळ जाऊन पाहतो तर काय. ती गाडी विठ्ठल वंजारेची होती व त्यांनी मला लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवली होती. त्यांच्या गाडीत येळम्ब पर्यंत आलो. येताना वाटेत. विठ्ठल वंजराने ते लातूरला गेल्याचे सांगितले. वाटेत त्यांच्या कर्जाचा मुद्दा निघाला. पण ते नशेत असल्याने मी केवळ त्यांना हो हो म्हणत होतो. घरी आल्यावर त्यांनी गाडी आमच्या घर समोर थांबवली व कांही वेळ थांबले. त्यांना मी पाणी विचारले पण त्यांनी पाणी पिण्यास नकार दिला. पुन्हा मी घरी येऊन टीव्ही पाहत बसलो.
रात्रीच जेवण केलं व रोजच्या प्रमाणे टीवी पाहून झोपलो.
..............................................************ शुभरात्री.....!!!!! ************ ..............................................
एव्हाना माझ सर्व उरकून कामाला जात असतानाच श्री.ढवळशंखसरांचे पुतणे भेटले म्हणजे त्यांनी मला पाहूनच गाडी थांबवली. व मला बँकेजवळ आणून सोडले. तसेच वाटेत त्यांच्या काकांचे गृघकर्जाच्या व्याजाचे प्रमाणपत्र विषयी चौकशी केली. मी त्यांना दुपारी चार नंतर येण्यास सांगितले. आज मी कामाला १०:१५ लाच पोहचलो होतो. त्या नंतर १०:३५ ला झहा व कोकीळ साहेब आले. नेहमी प्रमाणे काम झाल. दुपारी आरके मामा सोबत काळे यांच्या हॉटेलवर चहा घेतला. गेली आठ एक दिवस थोडा बाहेर जाण्यास वेळ मिळतोच आहे. तेव्हडेच पाय मोकळे होतात. आज पळसोकाराना भेटण्या साठी जायचं सकाळीच ठरवला होत. सकाळीच साहेबाना मला उद्या ता. ०२/१२/२०११ रोजी रजा पाहिजे असल्याचे संगितले होते. जेवण झाल्यावर दुपारी सर्व काम आटोपल्या नंतर मारत दर पंधरा मिनिटांनी सतत साहेबाना उद्याच्या रजेचा विचारून रजा पदरात पडून घेतली. त्या नंतर बँक सुटल्यावर कोकीळ साहेबांकडे माझी चावी दिली.
मी कोकीळ व रोटे बसटॉप वर आलो. बीडला जाणार होतो. पण निर्णय बदलला. आज दुपारी कोकीळ साहेब यांना काल त्यांच्या पत्नीस व त्यांना रिक्ष्याने ठोस दिल्याचे कळले. त्यात कोकीळ यांना पायास व हातास जबर लागले होते. तश्या अवस्थेतही त्यांनी मला रजेवर जाण्यास मद्दत केली. त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार. मी उद्या बीडला येणार असल्याचे पळसोकाराना फोन करून सांगायचे होते. पण ते शक्य झाले नाही.
काम सुटल्यावर काळबेरे यांच्या नेकनूर येथील नेटक्याफेवर जावून बसलो. तेथे पण संगणक दोन तीन वेळा बंद पडून माझ्या नेक्नुरला जाण्याचा पुरा विचका केला. तरी हि नेकनूर येथून मला बाहेर पडण्यास ०९:२० झाल्याचा त्या मुळे धारूर गाडी गेली होती. मग मिळेलत्या वाहनाने जाण्याचे ठरून. वरून (मांजरसुंभा) येणाऱ्या प्रतेक वाहनास हात करू लागलो. दरम्यान आक्काचा चार पाच वेळा फोन आला होता. शेवटी एक कर थांबल्याचा भास झाला पण ती पुढे गेली. पण त्या कर मधून एक व्यक्ती उतरून मला हात करत असल्याचे जाणवले. वाटल आता बर झाल. जायला वाहन भेटलं म्हणून गाडीच्या जवळ जाऊन पाहतो तर काय. ती गाडी विठ्ठल वंजारेची होती व त्यांनी मला लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवली होती. त्यांच्या गाडीत येळम्ब पर्यंत आलो. येताना वाटेत. विठ्ठल वंजराने ते लातूरला गेल्याचे सांगितले. वाटेत त्यांच्या कर्जाचा मुद्दा निघाला. पण ते नशेत असल्याने मी केवळ त्यांना हो हो म्हणत होतो. घरी आल्यावर त्यांनी गाडी आमच्या घर समोर थांबवली व कांही वेळ थांबले. त्यांना मी पाणी विचारले पण त्यांनी पाणी पिण्यास नकार दिला. पुन्हा मी घरी येऊन टीव्ही पाहत बसलो.
रात्रीच जेवण केलं व रोजच्या प्रमाणे टीवी पाहून झोपलो.
..............................................************ शुभरात्री.....!!!!! ************ ..............................................